बत्तेचाळीस हे असे वय आहे, ज्यात तुम्ही तरुण,प्रौढ, वयस्क, कशात येत नाही.
माणसाने कायम बत्तेचाळीसमध्ये रहावे.
जे बत्तेचाळीसांत बसत नाहीत, त्यांनी जन्मतारीख, कुंडली एडजेस्ट करून बत्तेचाळीसांत बसावे.
फिट बसावे, हिट दिसावे.
टमरु बत्तेचाळीस झाला त्याला आता दहा-वीस वर्षे होऊन गेली असतील. तो अजून बत्तेचाळीसच आहे.
बत्तेचाळीसमध्ये माणसाची बौद्धिक वाढ खुंटते- फ्रीज़ होते. तो युगानुयुगे बत्तेचाळीसमध्ये राहतो.
मी माझ्या आजुबाजूला अनेक बत्तेचाळीस पाहिले.... त्यात पुरुष होते- स्त्रियाही होत्या.
तेव्हा पुढे कधीतरी आपण बत्तेचाळीस होऊ असे माझ्या ध्यानातही आले नव्हते.
बत्तेचाळीसचा मानव सत्य हाती गवासल्यासारखा ठाम होतो.
माणूस निवृत्त झाल्यावर त्याची इनकम बंद होते, तशी त्याची बौद्धिक इनपुट बंद होते.
एकप्रकारे बत्तेचाळीस म्हणजे बैद्धिक निवृत्ति घेतलेला माणूस.
मजेदार बाब म्हणजे या वयात त्याचे वाचन-चिंतन वगैरे सुरूच असते.
मात्र त्याची मते मागेच् कधीतरी सत्य ठरल्याने या वाचनातून-चिंतनातून नवे काहीच गवसत नाही.
असे अनेक बत्तेचाळीस देशात मिनिटागणिक पैदा होत आहेत.
लोकसंख्यावाढीचा प्रश्न यापुढे काहीच नाही.
बत्तेचाळीस हा राष्ट्रापुढला मोठा धोका आहे. कॉंग्रेसी किंवा भाजपा वगैरे नाही.
जर राष्ट्राचे संपूर्ण बत्तेचाळीसीकरण झाले, तर आपल्याला स्वातंत्र्य, बत्तेचाळीसला मिळाले, असे मानावे लागेल.
आपण आपल्या आजुबाजूस बत्तेचाळीस किती आहेत याची जाणीव ठेवायला हवी.
त्याची शक्य झाले तर सरकार-दरबारी नोंद ठेवायला हवी.
हे करताना आपण बत्तेचाळीस झलेलो नाही, याची आवर्जून तपासणी करायला हवी.
बत्तेचाळीस हा एकप्रकारे बौद्धिक देवानंद आहे.
त्यामुळे तो 'चालताना' लटपटत असतो, मात्र याला तो बैठक असे स्टायलिश नाव देतो.
या बत्तेचाळीसांमुळेच राष्ट्रात सांप्रति फेसबुक प्रदेशी वा इतरत्र अनेक वाद चिघळताना दिसतात.
पुर्वी माणूस शारीरिक वय बत्तेचाळीस पार पडले की, बत्तेचाळीस होत असे.
आज 'सोमी' मुळे माणूस विशीतच बत्तेचाळीस होऊ लागलाय,
हा राष्ट्रापुढील गहन चिंतनाचा विषय आहे.
मात्र हे गहन चिंतन करण्यासाठी बत्तेचाळीस पदास न पोहोचलेले विचारवंत कुठून आणायचे?
त्यासाठी निविदा मागवाव्या लागतील.
पण समजा निविदाही बत्तेचाळिस आल्या तर?
माणूस निवृत्त झाल्यावर त्याची इनकम बंद होते, तशी त्याची बौद्धिक इनपुट बंद होते.
एकप्रकारे बत्तेचाळीस म्हणजे बैद्धिक निवृत्ति घेतलेला माणूस.
मजेदार बाब म्हणजे या वयात त्याचे वाचन-चिंतन वगैरे सुरूच असते.
मात्र त्याची मते मागेच् कधीतरी सत्य ठरल्याने या वाचनातून-चिंतनातून नवे काहीच गवसत नाही.
असे अनेक बत्तेचाळीस देशात मिनिटागणिक पैदा होत आहेत.
लोकसंख्यावाढीचा प्रश्न यापुढे काहीच नाही.
बत्तेचाळीस हा राष्ट्रापुढला मोठा धोका आहे. कॉंग्रेसी किंवा भाजपा वगैरे नाही.
जर राष्ट्राचे संपूर्ण बत्तेचाळीसीकरण झाले, तर आपल्याला स्वातंत्र्य, बत्तेचाळीसला मिळाले, असे मानावे लागेल.
आपण आपल्या आजुबाजूस बत्तेचाळीस किती आहेत याची जाणीव ठेवायला हवी.
त्याची शक्य झाले तर सरकार-दरबारी नोंद ठेवायला हवी.
हे करताना आपण बत्तेचाळीस झलेलो नाही, याची आवर्जून तपासणी करायला हवी.
बत्तेचाळीस हा एकप्रकारे बौद्धिक देवानंद आहे.
त्यामुळे तो 'चालताना' लटपटत असतो, मात्र याला तो बैठक असे स्टायलिश नाव देतो.
या बत्तेचाळीसांमुळेच राष्ट्रात सांप्रति फेसबुक प्रदेशी वा इतरत्र अनेक वाद चिघळताना दिसतात.
पुर्वी माणूस शारीरिक वय बत्तेचाळीस पार पडले की, बत्तेचाळीस होत असे.
आज 'सोमी' मुळे माणूस विशीतच बत्तेचाळीस होऊ लागलाय,
हा राष्ट्रापुढील गहन चिंतनाचा विषय आहे.
मात्र हे गहन चिंतन करण्यासाठी बत्तेचाळीस पदास न पोहोचलेले विचारवंत कुठून आणायचे?
त्यासाठी निविदा मागवाव्या लागतील.
पण समजा निविदाही बत्तेचाळिस आल्या तर?
No comments:
Post a Comment