खांडववनातील वैद्य कोल्हे यांनी आपली पदवी, वनातील आरोग्यमंत्र्यांना मधे घालून अधिकृत करून घेतली.
मंत्र्यांसाठी शिक्षणाची अट नसली तरी त्यांना धोरणे ठरवायचा अधिकार होता. काय योग्य आणि काय नाही,
हे ते आपल्या मर्जीने, मर्जीतील प्राण्यांसाठी ठरवित असत...
पदवी अधिकृत करताना कोल्हे यांच्यावर काही अटी होत्या.
म्हणजे रोगाचे निदान करण्यास वैद्यबुवांना परवानगी नव्हती.
त्यासाठी एक पुस्तिका ठेवलेली होती, त्या पुस्तिकेत पाहून रोग निश्चिती केली जाई.
आपले सेवाकेन्द्र उघडल्यावर तिथे पहिलाच रूग्ण आला, खरगोश.
तो शुभ्र असल्याने त्यात वरून काही खोट दिसत नव्हती.
ज्यात वरकरणी दोष दिसत नसेल त्याचा एक्स रे काढावा, असे पुस्तिकेत लिहिले होते.
त्या प्रमाणे एक्स रे काढला गेला. स्लाइड सगळी हिरवीगार आली.
पुस्तिकेत लिहिल्याप्रमाणे हा देशद्रोह होता.
त्याप्रमाणे खरगोशास देशद्रोह हा रोग जडल्याचे निश्चित झाले.
हा सारा उपचार बाजूने पाहणारा हत्ती वनात सर्वांत बुद्धिमान समजला जाई.
त्यामुळे तो समाजास मार्गदर्शन करे आणि नेहमी स्वत:ला सत्य वाटेल तेच बोले.
त्याने यावर तीव्र नापसंती दर्शवली. हा अन्याय आहे, खरगोश देशद्रोही नाही.
तुमची पुस्तिका निर्बुद्ध आहे. पण त्याचे कोणीच ऐकेना.
शेवटी पुस्तिका म्हणजे पुस्तिका !!
त्यामुळे तो समाजास मार्गदर्शन करे आणि नेहमी स्वत:ला सत्य वाटेल तेच बोले.
त्याने यावर तीव्र नापसंती दर्शवली. हा अन्याय आहे, खरगोश देशद्रोही नाही.
तुमची पुस्तिका निर्बुद्ध आहे. पण त्याचे कोणीच ऐकेना.
शेवटी पुस्तिका म्हणजे पुस्तिका !!
No comments:
Post a Comment