Thursday, December 24, 2015

२९. गोष्टी सांगणारा माणूस... आमचे सट्ट्याचे प्रयोग...


आमचे सट्ट्याचे प्रयोग...

सत्यावर सट्टा लावावा अशी परिस्थिति या भारतवर्षात अनेकदा उभी राहते.
सत्याचे दोन तट पडतात. प्रत्येक म्हणतो माझे तेच सत्य, तुझे ते असत्य.
एकाच वेळी सत्याची दोनच नव्हे तर अनेक वर्जन्स घेऊन उभा राहिलेला समाज म्हणजे आम्ही.
ही परिस्थिति बदलायचा जो प्रयोग मी जेव्हा-जेव्हा केला, तेव्हा-तेव्हा माझ्या सत्याचे वरील शीर्षकात रूपांतर झाले.

८० चे दशक असेल. आमच्या एरियात कोणातरी ‘आर’ ला. रीटयर्ड हर्ट नाही, व्यवस्थित जगण्याची हेलपाटी टाकून, ‘राम बोलो.’
आमच्या एरियात आम्ही नामचीन खांदेकरी. पालखीचे भोई असतात तसे आम्ही तिरडीचे ढोई.
आम्हाला हमखास आमंत्रण, फिक्स. ज्या घरात कधी बारशाला, पूजेला, एंगेजमेंट इतकंच काय, लग्नालाही बोलावत नाहीत,
त्यांचे हे एक आमंत्रण फिक्स आम्हाला. बरं ही आमंत्रण कधी काळ-वेळेला?
अर्थात काळ-वेळ बघून जाण्याची पद्धत नाही ना.
रात्री-बेरात्री, दसरा नाही, दिवाळी नाही- कॉल आला की ढोई निघाले.
इतके ट्रेन्ड लोक झालेत, की मयताच्या सामानाच्या दुकानातही समान चेक करून, वाजवून घेतात.
मागचे हिशेब काढून आज भाव घासघीस करतात. त्या दुकानवाल्यांनी पण आता हात टेकलेत.
असो, मुद्दा तो नाही. आज तिरडीवर काढतोय, ते आहे सत्य.

आता तुम्ही विचारलं, शाश्वत सत्य की अशाश्वत वगैरे , तर त्याला काही अर्थ नाही.
सत्य नेहमी कालसापेक्षच असतं.
तर ८० च्या दशकात आमच्या स्मशानात नुकतेच इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम सुरू झाले होते.
भाव मुदडी-दीडशे रुपये फक्त. तर सवा खंडीचा विषय निघाला, तसे मी पर्याय सुचवला.
फक्त दीडशे रुपये. घ्या सावलतीत आहे. च्यायला जुर्म हो गया.
“लाकडावर दहन ही आमची संस्कृती आहे. ती आम्ही जपणार. इलेक्ट्रिक वगैरे अमेरिकन नखरे आहेत. ते इथे नकोत.”
“अरे, पण एक मुडदा जाळायला लाकडे किती लागतात? म्हणजे झाडांचा- पर्यायाने पर्यावरणाचा नाशच ना?”
“हे तुमचे बुद्धिवादी तत्व तुमच्याकडेच ठेवा. नाहीतर त्यांना जाऊन सांगा, जे जमिनी खराब करतात.
आमची संस्कृती बघा. सारं काही राख होऊन जातं. म्हणजे खराब काहीच नाही.”
“अरे, पण जंगल, झाडे यांचा नाश होतो की. पर्याय नव्हता तिथे आणि तेव्हा ठीकाय.
पण आता सरकारने स्वस्त पर्याय उभा केलाय, तर वापरायला काय हरकत आहे?”
यावर मोठा वाद होऊन मी अधर्मी, धर्मभ्रष्ट, नास्तिक आणि अतिशहाणा ठरलो.
ते दहन रीतसर सवाखण्डीवर झाले. खरे तर सत्य तेव्हा असत्य ठरले म्हणजे, त्या लाकडांवर तेच जळले होते.
पुढे विद्युतदाहिनी नीट वापरात यायला आणखी चार-पाच वर्षे गेली,
आणि दहा वर्षांनी तर , तेव्हा ज्यांनी मला भ्रष्ट, अतिशहाणा ठरवले होते,
त्यांच्या घरातील उत्तरक्रियाही विद्युतदाहिनीवरच झाल्या.
 आता पुरोहितांनी ही पद्धत सशास्त्र धर्मातही आणली आहेच.
थोडक्यात- धर्म म्हणजे कर्मकांडे आणि परंपरा, यांचा एव्हढा झापडी पगडा आपल्यावर आहे,
की त्यात बदल म्हणजे धर्मनाश, असे काही आपल्या डोक्यात रुजते.
यात सत्याचा प्रयोग सट्ट्याचा ठरतो, याचा हा एक अनुभव.
 
असेच एकदा भारत देश आणि त्याच्या महानते विषयी गप्पा सुरू होत्या.
म्हणजे तो भारत नाही, जो १९४७ साली स्वतंत्र झाला, तर तो भारत जो प्रत्येकाच्या कल्पनेत अस्तित्वात आहे.
या चर्चेचे नमुने:

“लंका आणि भारत यांना जोडणारा सेतू आहे. आजही दिसतो. नासाने ही मान्य केलेय, आता बोल!”
“काय बोलू? सेतू होता म्हणून आपल्याच जहाजांना संपूर्ण श्रीलंकेला वळासा घालून मद्रास नाहीतर कलकत्त्याला जावे लागते.”
“जाऊ देत ना! त्यांना लांब पडते म्हणून आम्ही आमची ऐतिहासिक रचना तोडणार नाही.”
“अरे सुवेझ, पनामा असे कालवे झाल्याने समुद्रप्रवास, किती वेळ, श्रम आणि पैसा वाचवतो आहे.”
“तुला शेवटी सेतूवरच घाव घालायचाय ना? हीच अपेक्षा तुझ्याकडून.”
मी तिरडीवर.

“भारत सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याकडे एव्हरेस्ट आहे, त्यावर पहिल्यांदा जाणारा तेनसिंग नोर्गे आहे.”
“तो तेंझिंग आहे.” करेक्ट?
“म्हणून काय झालं?”
“अरे तेंझिंग नेपाळी होता. आणि हे जे एव्हरेस्ट म्हणतोयस ना, त्याचा अर्धा भाग नेपाळमध्ये आहे आणि अर्धा चीनमध्ये.
आपल्या हद्दीत एक कण नाहीये.”
“काय बोलतोस!” पूर्ण अविश्वास!
“तुला खूप बरं वाटलं असेल ना? ते भारतात नाही म्हणून?”
हा अस्सल प्रतिवाद झाला. घालशील! घालशील परत वाद?
काढ तिरडी!  

“जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक , ताजमहाल, आपल्याकडे आहे, हे तर मानशील?”
“हे मी का मान्य करू नये? कारण देशील?”
“आता बघ! झटक्यात मानतोय! कारण तो मुसलमानांनी बांधलेला ना!”
नशीब याने तेजोमहालाची स्टोरी ऐकली नाहीये.
“साले हे फुरोगामी असेच! आपल्या कशाचं कौतुकच नाही आणि जरा दुसर्‍याचं दिसलं की डोक्यावर घेऊन नाचा!”
“एक मिनिट, मी कंफ्यूज आहे. मला समजावं जरा. आपलं, दुसर्‍याचं म्हणजे नक्की काय?
इतिहास घडताना त्या लोकांना काय स्वप्न पडलेलं का?
की पुढे असा-असा एक महान देश जन्म घेणार आहे- तेव्हा घडायचं तर त्याच्या हद्दीत घडू या, नाहीतर नकोच ते!”
“म्हणजे? काय म्हणायचंय? स्पष्ट बोल?”
“बघ आपल्या पुराणात वर्णन केलेले कित्येक प्रांत, राज्ये आज बांगलादेशात आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानात आहेत.
तर आज त्यांचा अभिमान बाळागायचा की नाही?”
“म्हणाजे पाकिस्तान आणि बांगला देशचा?”
“नाही प्राची आणि तक्षशीला वगैरे?”
“का?”
“नाही तुमची परमिशन नसेल तर आपण १५ ऑगस्ट १९४७ पासून नको मानुया त्याचा अभिमान. गांधारचाही नको.”
“आता ते आपल्या देशात नाहीत ना, संपलं!”
“हो पण ते आता दुसर्‍या देशांत आहेत, तर त्यांचा द्वेष करायला (च) हवा का? ते ही सांगा.”
“हा हरामखोर आहे. शब्द गोल-गोल फिरवून फसवतोय.”
“यांच्यामुळेच तर वाट लागली.”
भारताच्या फाळणीत माझा वाटा आहे, हे मला असे समजले. तिरडी!
“मला सांगा, भारताच्या पश्चिमेला काय आहे?”
“अरबी समुद्र”
“का?”
“का म्हणजे काय? आहे म्हणून आहे!”
“पण अरबी समुद्रच का? भारतीय का नाही? साला रोज तुम्ही चौपाटीवर जाता, ते अरबी समुद्र पाहायला?”
माझ्या आता मस्तीच आली होती.
“समुद्राच्या पाण्याची कसली जात पाहतोस? नावात काय आहे? समुद्र तो समुद्र ना?”
इतका सुंदर लॉजिकल विचार करू शकणार्‍या मित्राचा मला हेवा वाटला.
समुद्र –समुद्र, जमीन-जमीन नाही.

“मला एक डाऊट आहे.”
“आता आणखी काय?”
“समजा, भारताचा एक मुस्लिम सैनिक, लढाई करत पाकिस्तानच्या हद्दीत गेला.
खूप पराक्रम केला त्याने, आणि समजा, युद्धात जखमी होऊन पडला त्यांच्या हद्दीत... तर त्याचे प्राण कुणी वाचवायचे?”
“म्हणजे काय? आपले सैनिक जातील आणि वाचवतील!”
“नाही, समजा जबरदस्त शेलिंग सुरू आहे. कोणी जाऊ शकत नाही. त्याचे प्राण आता फक्त देवच वाचवू शकतो. तर..?”
“तुला काय म्हणायचंय? स्पष्ट बोल!”
“नाही म्हणजे, त्याचे प्राण वाचवायचे कोणी?
भारताचा सैनिक आहे म्हणून देवाने की, मुस्लिम आहे, म्हणून अल्लाने?
आपला देव पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्या सैनिकाचे प्राण वाचवेल?
की अल्ला, त्याच्या बंद्यांशी युद्ध करणार्‍या काफिराला वाचवेल?”
“तू स्वत: कंफ्यूज आहेस, आणि आम्हा क्लीयरहेड लोकांचा बुद्धिभेद करतोयस!”
“याच्या नादाला लागू नका, हा दुंनियेवरून ओवाळून टाकलेला आहे.”
“कोणी का वाचवेना! तुला काय पडलीय?”
“फक्त तिरडी बांध तू !”

-देव एकच आहे हे शेवटपर्यंत कोणी बोललाच नाही.
तिरडी !

२८. गोष्टी सांगणारा माणूस...ललित कथा


"या माणसाला शिस्त कशी ती नाहीच. वर लाज-शरम सारे कोळून प्यालाय!"
"अष्टभुजे, हा माणूस- नात्याने कोणीतरी लागतो, आपला." लाज-शरम कोळून प्यालेला माणूस, वात नीट करतो.
"कुठल्या मुहूर्तावर या माणसाची गाठ पडली, माहीत नाही. देवा, इथे भेटलाय, वर भेटवू नकोस?" ...
"इथे तरी का भेटवले, माहीत नाही!" ला.श.को.प्या. माणूस फुसुक्.
"काय-काय? मोठ्याने बोल ना! हिम्मत असेल तर!"
"जन्म झाला तेव्हा मी मोठ्याने बोलायचो. अगदी आईसमोरसुद्धा."
"मग पुढे काय झालं?"
"पुढे लग्न झालं."
"आवाजाचं काय झालं?"
"ते कळलंच नाही. बरा होता बिचारा!"
"फालतू जोक! फेसबुकवर टाक तो! इथे नाय हसणार कोण!"
देवीने परफेक्ट पकडला.


अष्टभुजेच्या नात्यात कसलंतरी फंक्शन होतं. तेच, सोन्याने लगडलेल्या म्हशी फिरत असतात, तसलं.
हमखास टाळावी अशी इव्हेंट. मी बॉसला ब्लाइंड लावला. ऑफिसात सीधे नऊ वाजवले.
मुश्किल में काम आनेवाला दोस्त, जगू को साथ लिया, टॅक्सी मारके सीधे ललित.
फोन सायलेंटवर ठेवून अपलवले. तिथूनच प्लान करून जगुलाच इमर्जन्सी वॉर्डमध्ये फेकला,
आणि त्याच्याकडेच झोपलो. नेक्स्ट डे सॅटरडे...

अष्टभुजा मूर्ख नव्हती. ती या केसवर रीसर्च करणारच.
म्हणून फुल सेटिंग केली होती. जगुलाच फोन करून इमर्जन्सी वॉर्डची आणि त्याचीच चौकशी,
पुढचे चोवीस तास कसे क्रिटिकल आहेत, वगैरे करत होतो, तर डिंग-डाँग!
एंटर्ड अष्टभुजेची सहेली फॉर्म गिरगाव! शत्रुपक्ष आला तो थेट किचनमध्ये.
गुप्तवार्ता झाल्या. दोन तासांनी शत्रुपक्ष छद्मी नजर टाकत गेला, तेव्हाच लकाकली होती.
अष्टभुजेने काहीवेळ शांतता राखली. ती अंगावर येऊ लागली म्हणून,
"काय म्हणत होती रेखा?" असा टाकला.

 "जिला-तिला रेखा म्हणू नको! तुला वाटत असली तरी! नीता नांव आहे तिचं."
"अरे वा!"
"अरे रे म्हण! तुझे कालचे ललित लेखन वाचले तिने."
"मग? आता काय इथे समीक्षा करायला आली होती?"
"ती मी करते. रेखा म्हणे! रेखा!!"
साला हा बाण वर्मी बसला वाटतं.
"काय करतो तिचा नवरा हल्ली?" मी हवाबाण हरड़े बदलू घातले.
"ललितमध्ये मॅनेजर आहे."

सन्नाटा...... साला बार बदलायला हवा- एव्हढाच विचार करू शकलो.
पुढे कानात अनेक आवाज आणि डोळ्यांसमोर फिरते नेहरू तारांगण.

जाग आली तेव्हा मी वार्ड नंबर तेरा सर्जिकल.
" पुढचे चोवीस तास क्रिटिकल आहेत.", एक बावा बोलत होता.
"डॉक्टर काहीही करा! त्याला वाचवा! माझं मॅक्विन्टोशचं दुकान आहे हो तो!
तो गेला तर माझं कसं होईल? मी कुणाकडे बघू?"

साला जगू! हा मेलोड्रामा त्याचाच!
अष्टभुजेचे डायलॉग्ज दुसरा कोण मारणार?

Sunday, December 20, 2015

२७. गोष्टी सांगणारा माणूस... टोटका

"बोल कांच्या, ग- ग रेss गुत्त्यातला, म-म रे ss मटक्यातला, भ-भ रे ss"
सळया, विटांनी भरलेल्या कन्स्ट्रक्शन साइटवर नव्याने लागलेल्या कांच्याची माल्ट्या, मराठीची शिकवणी घेत होता.
साइटवर रहायचं तर मराठी यायलाच हवं, नाहीतर उद्या सकाळी काठमांडू! असा दम भरलेला.
ते नेपाळी पोर भेदरलेलं... माल्ट्याच्या ढुसला नाही, मराठीला!
पहिल्याच दिवशी ष क्ष ळ वगैरे उच्चारायला लावून कांचा जेरिस आणलेला.
माल्ट्या एका हाती चार इंची प्लायवुडची पट्टी घेऊन प्रत्येक चुकीला त्याच्या पोटरीवर चपाती काढत होता.
पोर बाप जन्मात मराठी शिकणार नव्हतंच! ते मार खात होतं, नंतर पैशा मिळणार म्हणून.
रोज तीन शब्द आणि एक जोडाक्षर बोलला की त्याला रूपया मिळायचा. तो रुपया जपून ठेवायचा.
त्याला पैसे मिळत होते ते रात्री साइटचा पोरांना मुक्त वापर करू देण्यासाठी.
मग तेलाचे झाकणदिवे लावून कुठे फोर-एट फिल्ड लागे. कुठे मैफल. दुनियेला ताप नाय, मेंढीचा खतरा नाय की रेडची डर नाय.
एकेका टायमाला तीन-तीन फिल्ड सेट व्हायची. टेबलच दोन-तीन हजार निघायचं.
त्या दिवशी पौर्णिमा होती, म्हणून आरुमुगमला संचार दिसणार होता.
आरुमुगम साइटवर बिगारी, त्याला शक, त्याच्या बायकोवर, येरिमलईवर कोणी करणी केलीय.
त्यावर उपाय करायचा तर माल्ट्याला केस हिस्टरी माहीत हवी, म्हणून कांच्याला हाताशी घेतलेला.
आम्हाला पता काय, आम्ही कोणती बला खड़ी करतोय!
आरुमुगमला सांगितलेले, करणी काढायची तर पैसे खर्च करावे लागतील.
त्यात एक कोंबडी, बैदा, हळद, गुलाल, धूप अगरबत्ती, कणीक आणि लिंबू लागेल.
कोंबडीचा नंतर येरिमलई प्रशाद बनवेल, दारू आमची. खुशी खुशी तयार झाला आरुमुगम.
त्याची पनौती सस्त्यात कटणार होती. पैसे घेऊन कांच्याला संध्याकाळी मार्केटला पाठवला.
विडी,सिग्रेटी, सोडा-दारू टेबलखर्चीतून, आपल्याला ताप नव्हता.
पोरांनी लाकूड-पाचोळा पहिल्या मजल्याच्या स्लॅबवर आणून ठेवला. जय्यत तयारी होती.
करणी काढायची म्हणजे साधीसुधी बाब नव्हती.

माल्ट्या ही एक वल्ली आहे.
सुपीक डोके, त्यात बडे खानदान का पोता.
वर मुंबई सर्किटला गाजलेले थिएटर केलेला.
संचार म्हणजे त्याच्या सुपीक डोक्याला आणि अभिनयाला पर्वणी.
रात्री नऊला खोलीच्या मध्यात लाकुड- पाचोळा रचला.
उतार्‍याच्या कामात बाईमाणूस चालत नाही- म्हणून येरिमलईला, साइटपाठी त्यांची झोपडी होती
तिथे नारियल-मसाला बनवायला सांगितले.
मुरगी बळी दिली की चवन्नी ती साफ करून तिला देणार होता. कशी साफ करणार होता माहीत नाही.
कारण चवन्नीकडे फक्त पॅरापीटवर लपवलेल्या हत्यारातला एक चॉपर होता.
मुरगीची गेम करणार होता चवन्नी.

अंधार पडला, झाकणबत्त्या लागल्या तशी माल्ट्याने सुरुवात केली.
आधी कपडे उतरवले आणि इनरवर हातात उदबत्त्या धरून तो खाली साइटच्या टाकीवर गेला. मागे आरुमुगम - नंतर सेना.
कुठलेतरी अगम्य मंत्र उच्चारात माल्ट्याने टाकीत मुटका मारला. आर्किमिडीजच्या नियमाप्रमाणे टाकी बाहेरची पब्लिक चिंब!
टाकीत आवाज घुमवत माल्ट्याने तीन डुबक्या मारल्या आणि तसाच ओल्या अंगाने बाहेर आला.
चवन्नीने त्याच्या डोक्यावर गुलाल उधळला. माल्ट्या लालमलाल. विश्याने गवताची एक चूड करून पेटवली.
ती घेऊन माल्ट्या पुढे आम्ही मागे. मंत्रात मध्ये-मध्ये शिव्या यथेच्छ पेरलेल्या.
त्या करणी करणार्‍याला आहेत- असे आरुमुगमला पटवले.
पहिल्या मजल्यावर येताच माल्ट्याने जमवलेला फाटा, चुडीने पेटवला. लिंबू समोर ठेवले.
बाजूने हळद, कुंकवाचे सर्कल काढत मान हलवत तो तोंडाने बुगू-बुगू आवाज काढत होता.
अंग अजून ओलेच असल्याने पेटलेल्या कुंडासमोर तो हबशाची शिसवी मूर्ति वाटत होता. ब्युटिफुल ब्लॅक.
आता त्याने भूतांना बोलावत, आणलेली कणीक इथे-तिथे उडवायला सुरुवात केली.
माहौल इतना खतरनाक की, कांचाचे डोळेसुद्धा उघडलेले!
मग संचार सुरू झाला. माल्ट्याचे सगळे अंग थरथरू लागले. तोंडाला फेस आला. बुबुळे गारगोट्या झाली.
आरुमुगम दहशत बसून बघत होता. अचानक माल्ट्या किंकाळ्या फोडू लागला.
साइटवर रात्री भुता-खेतांचा संचार असतो- अशी हवा असल्याने कोणी फिरकणार नव्हतेच. भुते एकदम सेफ होती!

किंकाळी फोडून माल्ट्या धाडकन खाली कोसळला. मग हळूहळू उठला तेव्हा नजर आरुमुगमवर रोखलेली.
'तुम्हारा नाम आरुमुगम... बाप सिलवाराज .... बिबी येरिमलई. तुम्हारा बाप मरा, अम्मा बिमार, भाई खेती करता.
बहन शादी करके गयी. इस में सब अच्छे। एक चाचा खराब। उसका बेटा झगड़ा करता। मैं सब को देख लूँगा।
तुम हर रविवार को येरिमलाई के साथ समुंदर जाना, उसकू नारियल पानी पिलाना,
ठंडा खिलाना, सब ठीक हो जाएगा।' भूताने एकदम सही विलाज दिला.

आरुमुगम थक्क! एव्हढी सही हकीकत माल्ट्या नाही- भूतच देऊ शकणार.
सही हकिकत कांच्याला रोज रूपया देत काढवून घेतलेली.
आता माल्ट्या करणी उतरवू लागला. मुर्गीला हळद-कुंकू फासले.
चवन्नीकडून चॉपर घेतला. आता मुरगी कटणार एव्हढ्यात एक भयंकर किंकाळी फुटली.
कांच्या भेदरून आडवा झालेला.
किंकाळीने दचकलेल्या माल्ट्याच्या हातून मुर्गी सुटली. ती फड-फड करत धूंनीभोवती पळू लागली.
तिच्या मागे आम्ही. मुर्गी पळ-पळ पळाली आणि पीलरच्या बाजूने पॅरापीटवर उतरली.
तिथुन स्ट्रक्चरची एक बीम जिला पुढे सळया होत्या, त्यावर गेली. पार सळीच्या टोकावर जाऊन उभी राहिली.
चवन्नीने बीमवर तोल सांभाळत जायचा ट्राय मारला पण त्याचाच आरया व्हायची वेळ होती.
आम्ही शिव्या घालून मागे खेचला त्याला.
मुर्गी वातकुक्कुटासारखी शिगांवर उभी. मागे खोलीत घुमण्याचा आवाज येऊ लागला.
माल्ट्याची काही नवी आयडिया असावी म्हणत आम्ही मागे धावलो तर माल्ट्या पॅंट चढवत होता.
आणि शेकोटी समोर गुढग्यावर बसुन, डोळे फिरवणार्‍या आरुमुगममध्ये संचार झाला होता!

मुर्गी सलियापे, आरुमुगम में संचार, कांच्या बेहोश और हम सब माल्ट्या को गाली देते रहे.

२६. गोष्टी सांगणारा माणूस...एका भग्नाची..भाग -2 अर्थात,

एका भग्नाची..भाग -2 अर्थात,

भग्न तळयाकाठी...

फेड इन-
पुलियापे कावळा, चिमणी आणि बाज़ आमने-सामने, खंदकात सेना, बारूद के साथ-
पलिकडे नामधारी रणगाडे, बांबू होविट्ज़र तोफा... आणि बटकी खंदकात फळीला आय-माय वरून शिव्या देतोय.
समोरचा सीन हलत नाय, हे पाहून वकिलने कॉमेंट्री सुरू केली-

" स्लो मोशन में बाज़ कौऐ को - बाज की ये बात थोडीसी ऑफ़ स्टंपपे के बाहर और बाहर की तरफ.
जाती हुई, कौएने छेड़ने की कोशिश की, भाग्यशाली रहे, थोबड़े का बाहरी किनारा नहीं फूटा,
बाज ने छोड़ दिया- कोई रन नहीं."

इतक्यात छ: फ़ीट बाज़ने आपले विशाल बाहू पसरले आणि कौव्याला मगरमिठीत घेतले.
"और ये अफ़जल ने सिवा को बीच पुलिया दबोच लिया! सिवाकी पसलिया तोड़नेकी कोशिश,
सीवा परिंदे की तरह फड़फड़ाता हुआ, और ये आउट!"
प्लग काढ़ायला लागला वकीलचा!
"कौवा, वाघनख काढ! कौवा वाघनख काढ!!" मॅक ओरडत होता. सिवा कुठे ऐकतोय. तो फडफडतोय!
तोवर "फायर!!" असे ओरडून काबाने ढेकळे फेकायला सुरुवात केली!
ती पुलावर आसपास पडून बंबार्डींग झाल्याचा फील आला.
होविट्झर तोफा आता लुंगी आणि बांबू सावरत पुलाकडे धावू लागल्या.
"भाग कौवा भाग!!" आमचे कौव्याला इशारे- पण हे काय!?
बाज़ आणि कौवा आम्हाला हात करून बोलवताहेत.
साले हसतायत! मग सेना काय फुकट बोलावलीय?
आम्ही मजबूत ढेकळे फेकून पुलावर कोहरा मचवून दिला.
नामधारीचे पैलवान आधी पोहोचले, पण कौवा सेफ होता. आम्ही खंदक सोडले आणि पुलावर पोहोचलो.

"अरे, ऐसे राड़ा नहीं कराते, दोस्तों। अब जो हुवा सो हुवा, मगर मानता हूँ आप लोगों को!"
बाज़ जावयावर खुश होता की आम्ही दिलेल्या फाइटवर , माहीत नाही, पण त्याने काबाला मिठी मारली.
नशीब काबा पाठमोरा नव्हता!
तोच पलिकडून टेंशन ढोलक घेऊन आला. त्याने पुलियावरच वाजवायला सुरुवात केली.
कौवा-चिमणी मध्ये आणि आम्ही बाजूने फेर धरला.
नामधारीचे पैलवान ऑफ बीट टाळ्या वाजवत होते, म्हणून मॅक ने त्यांना नाचायला खेचले.
आता ती धुडं ऑफबीट नाचू लागली.
"आवरी मोटी SSS" पासून काय वाटेल ते गायलो! वरात घरी नेली.
कर्नलीण बाय साफ दारं-खिडक्या बंद करून कानाला हिमालय लावून झोपलेल्या!
आज त्या बाज़ला घरात झोपायला घेणार नाहीत- हे फिक्स झाले.

चिमणीला भेटायला बाज़ला बंदी.
सकाळी गच्चीत कपडे वाळत घालायला चिमणी आणि बाय समोरासमोर आल्या की चेहरे वाकडे करायची कॉम्पिटिशन!
त्यात अर्थात चिमणी जिंकायची.
तिने पृथ्वीला अॅक्टिंग कोर्स केला होता, म्हणजे बोला!
बाज़ नाक्यावर आमच्याकडून चिमणीची खबर काढायचा.
चिमणीला काय पडलेली नव्हती.
असा महिना गेला.
मग चिमणी आणि बाय एकमेकींना चोरून भेटतात अशी खबर नाक्यावर आली.
बाज़नेच आणली.
खबर खरी होती- कारण कौवा अचानक पुलियावर यायचाच बंद!
कुठे दिसला की गल्ली बादलायचा. ही बेईमानी!!
एकदा मॅकने सोमावाण्याकडे रंगेहात पकडला त्याला.
एक हात में थैली दुसरे में यादी! बाराच्या भावात पोहोचला होता कौवा.
तीन महीने गेले, मी घसा धरला म्हणून काणे डॉक्टरकडे गेलो, तर बाहेर ही SS रांग.
रांगेत कौवा. चेहरा मायूस, दुनियेची उदासी घेऊन.
“साला कौवा, तुला काय कावळा शिवला, की तीन महीने नाक्यावर पत्ता नाय तुझा?”
कौव्याने मला बाजूला घेतला-
“यार नाग्या, तुला म्हणून सांगतो- कुठे बोलू नको..” ही कौव्याची नेहमीची स्टाइल.
कुठे बोलू नको, करत दुनियेला सांगेल.
“अरे कौव्याचा चिमणा करायचा फुल प्लान तयार आहे.
माझ्या ज्या-ज्या सवयी बाय ना पटत नायत त्या-त्या बंद!
नाका बंद, विल्स बंद, लाईफबॉय बंद, मच्छी बंद, बियर बंद, फटी जीन पहनना बंद,
दाढी साफ पायजे. भांचो लिपस्टिक लावायची बाकी ठेवलीय मला!
साला मी कोणाला पटवलीय, चिमणीला की बायला, टोटल नाय रे मला!”
कौवा भडाभडा बोलत होता. तीन महिन्याची भडास निकालत होता.
“तू बाज़ला बोल ना! तो तर आपली पार्टी आहे ना?” मी
“अरे बोललो त्याला. तो म्हणतो काही उपयोग नाहीत, माझ्यावर पण सेम ट्रीटमेंट केली होती बाय ने!”
मी खल्लास!
हल्ली कौवा सफेद तलावाच्या भिंतीवर सफेद लिबासमध्ये देवदास सारखा बसून असतो.

ते तळेही आता भग्न झाले आहे.

२५. गोष्टी सांगणारा माणूस ... एका भग्नाची गोष्ट...

एका भग्नाची गोष्ट...

लोक लग्न का करतात?
करतात तर करतात, पण त्यात आपले दोस्त स्टेकला का लावतात?
आमच्या दोस्ताच्या मनात तशी चिमणी भरायचं काही कारण नव्हतं.
तो काही चिमणा नव्हता... आम्ही त्याला कावळा म्हणायचो.
आता कावळ्याने चिमणीशी रिश्ता करायचे ठरवले,
मुख्य म्हणजे चिमणीही राजी झाली, त्याला कोण काय करणार? क़ाज़ी बी पॅक!
म्हणतात ना, जवानी की नज़र- दीमाग बेअसर, अशी वार्ता झाली.
सुख-दु:ख में साथ निभने का वादा किए यार, एकसाथ दोस्त के लिये शहीद होने चले.

कावळ्याने, चिमणीच्या बापाकडे केलेली अर्जी खारीज हो गयी.
"दुंनियेतला कुठलापण मच्छर आण, पण हा कावळा नको."
चिमणीचा बाप कर्नल, पब्लिक टरकून त्याला. बॉर्डरवर मशिनगन चालवलेला माणूस. आता
रिटायर होऊन, नामधारीच्या आखाड्यावर घुमत असतो.
सोबत आकडेबाज मिशांचे दोन-तीन महाराज घेऊन फिरतो.
कावळा, खीशातले पाकीट, बेल्ट आणि बुटांसकट चाळीस किलो.
त्याचे घर चिमणीच्या बरोब्बर समोर, त्यामुळे त्याच्या रोज़ाना लीला पाहून
कर्नलसायबीणीने त्याची किंमत ऑलरेडी दो कौड़ी केलेली.

चिमणीने बापाचा गोल करायचा ट्राय मारला पण,
“रिश्ते में हम तुम्हारे बाप होते है, नाम है बाज़!” असे आपल्या आकडेबाज़ मिशांना पिळत बाज़.
चिमणी इमोशनल, 'बाज़ की पर्मिशन बगैर रिश्ता नई हो सकता!'
गँगचे एकत्रित वजन नामधारीच्या महाराजांपेक्षा चौतीस किलोने कमी.

“हे लोक आपली हड्डी चरकात घालून रस काढतील.” घंसा टरकलेला.
“यांना मारायला रणगाडा बोलवावा लागेल.” युद्धखोर काबा.
“रणगाडा नको ए काबा, तू नुसता तोफ करून उभा राहिलास, तरी दाणादाण उडेल.”
काबाने युद्धात पाठ दाखवली की तुम्ही मेलात! अस्सल बारूद उडवतो!
“यार कौवा, सोडून दे रे, चिमणी-बिमणी. नायतर नाक्यावर आपले हुतात्मा स्मारक.”

पण कौवा साला आम्हालाच इमो देत होता. एकदम जीव द्यायच्या गोष्टी.
मग दीमागवाला म्हणून पब्लिक मला वरवंटा घासायला अर्ज़ करू लागली.
गुरिल्ला वॉर ! गनिमी कावा पर्याय निघाला.
चिमणीने रोज दोन दोन ड्रेस पाटलांच्या प्रेसवर टाकायचे, तिथून थेट कावळ्याकडे!
ड्रेसिंग टेबल, मैत्रिणींनी उधारीत साफ केले. थेट कावळा.
वह्या-पुस्तके, नोटस- बापजन्मात अभ्यास न करणार्‍या पोरांनी ‘काढायला’ नेल्या.
घंसाचा दोस्त बांद्रा रजिस्ट्रार ऑफिसला होता. ती सेटिंग झाली.

सकाळी चिमणी उठून कॉलेजला निघाली , तिथून थेट रजिस्ट्रार ऑफिस!
सेफ साईड म्हणून एका हवालदारालाच विटनेस केला.
चिमणी आयुष्याची परीक्षा पास झाली. कावळा तर पार धंद्याला लागला.
चिमणी रडेल म्हणून मी बघत होतो, पण तिची रोज़ाना भंकस सुरू होती.
थेट सिद्धीविनायकाची फिरकी घेत होती,
म्हणे, “कावळा म्हणून वरलाय, त्याचा चिमणा करू नकोस रे SS बाबा!”
पण तिचा प्लान तोच होता. कावळ्याचे रिइन्कार्नेशन.
सिद्धिविनायकाला पटवून टॅक्श्या मारल्या ते थेट कॉलनी.
तिथे बाज़सोबत नामधारीचे महाराज हातात बांबू घेऊन उभे.
आम्हाला दुरून पॅटर्न टँकसारखे दिसले.

समोर रस्ता खणला होता, पुलाचे काम सुरू होते. आम्ही पटापट खंदकात.
दोनच रस्ते होते, 'भागी नाख ना ते फोडी नाख!'
ढेकळांचा बारूद घेऊन तयार होतो. ‘फायर!’ के इंतज़ार में.
कावळा- चिमणीना हातात हार देऊन पुढे केले. दोघे पुलिया क्रॉसवर थांबले.
ऑपोजिट पार्टीतून बाज़ पुढे झाला. आम्ही श्वास रोखून... हातात ढेकळे.
त्या टोकाला नामधारीचे पैलवान.
बाज- कावळा- चिमणी, आमने-सामने. क्या बोल रहे है? सस्पेन्स....
काड ! एकच आवाज झाला....

साला, बटकी खड्ड्यात !
खड्ड्यातून दिसत नाय म्हणून फळीवर उभ्या बटकीच्या वजनाने फळीच तुटली.
बाज़ आणि कावळा अॅट निगोसिएशन. चिमणी अंगठ्याचे नेलपॉलिश ताकती...
आम्ही खंदकात, ढेकळांनी नेम धरून...

ब्लॅकआऊट.....

Friday, November 27, 2015

२४. गोष्टी सांगणारा माणूस... न्यूरेनबर्ग स्पीच.


[ पडदा उघडताना अंधार. हिटलरच्या बर्लिन मधील एकाद्या भाषणाचा आवाज येतो.
लोकांच्या टाळ्या. अंधारात एक मोठी पडछाया हातवारे करत आहे.
तिच्या मालकावर हळुहळू उजेड. एडोल्फ हिटलर चान्सलर होण्यापूर्वी देत असलेले एक भाषण.]

हिटलर :
 ...आमचं असं ठाम मत झालेलं आहे की राष्ट्रसंघ निर्मितीपुर्वीचा काळ हा जर्मनीसाठी जास्त सन्मानाचा आणि जास्त माणुसकीचा होता...
 आम्ही विचारलं युद्ध आवश्यकच आहे का ? तर हे ज्यू शांतीचे दूत म्हणाले, नाही!
देशां-देशां मधला वाद, एकाचे हक्क दुसरा हिसकावून घेतो तेव्हा निर्माण होतो... असे वाद राष्ट्रसंघ शांततेच्या मार्गाने सोडवेल!
हा ! मला असा एक देश बघायचाय जो अन्याय झाल्यावर या संघाकडे येईल
आणि राष्ट्रसंघातल्या ताकदवान देशांविरूद्ध न्याय मिळवून दाखवेल.

आमच्यावर महायुद्धाला सुरुवात केल्याचा आरोप आहे.
व्हर्सोयच्या तहात आमची लांछनास्पद मानहानि केली गेली ! कलम चौदा हे ते मानहानीकारक कलम !
आम्हाला हत्यारे बनवायला बंदी, सैन्य उभारायला बंदी, जहाजं बनवायला बंदी आणि व्यापारालाही बंदी !?
कलम २३१- महायुद्धाला जबाबदार जर्मनीच असून या गुन्ह्याबद्धल तिने २२६ दशलक्ष राईशमार्कस इतकी भरपाई करावी!
 जर्मन आर्यांनो, हा तह नाही... जर्मनीचं कफन आहे ! मान्य नाही आम्हाला व्हर्सायचा तह !
कोणी केला हा तह !? सप्टेंबरचे गुन्हेगार ते हेच, ज्यू ! मी म्हणतो, जर्मनी युद्धात, रणावर हरलीच नाही...
तर घरच्या भेदी ज्यूंमुळे हरली ! मला सांगा, अमेरिकेला जर्मनी विरुद्ध युद्धात कोणी पाडलं ?
.. युरोपच्या महायुद्धात, अमेरिकन ज्यूंच्या कारखान्यांनी शस्त्रं पुरवली... महाप्रचंड धंदा केला... शस्त्रांची जागतिक शेती !
पण एव्हढ्याने या लालची ज्यूंची तहान भागली नाही..
म्हणून मग, ज्यू सटोडियांच्या तालावर चालणार्‍या हर्स्ट प्रेसने जर्मनी विरुद्ध गरळ ओकायला सुरुवात केली.
जागतिक अशांती आणि युद्धांमध्ये या ज्यूंचा नेहमी मोठ्ठा फायदा होतो... आणि म्हणून हे युद्ध लढवतात.
मध्यआशियातून आलेला एक साधा ज्यू व्यापारी युरोपमध्ये पंतप्रधान व्हायची स्वप्नं पाहायला लागला...
 का ? ... कसा ?... युद्धातील नफेखोरीमुळे आलेल्या प्रचंड पैशांतून, हा माज यांना आला !
या ज्यूंचा छुपा हेतू आहे, जगाची सत्ता काबिज करणे!
जागतिक युद्धं आणि क्रांती ही संधी त्यांना मिळवून देताहेत. ह्या संधी मिळाव्यात म्हणून आमच्यावर युद्ध लादली जाताहेत !
हे म्हणाले क्रांति करा ! केली ! युरोपीय राजसत्तांचा पाडाव क्रांतीनेच केला गेला आणि यातही या ज्यूंनी अमाप फायदा उकळला !
संख्येने हे आमच्या एक टक्का ही नाहीत, पण व्यवसाय, शिक्षण, कला, संस्कृति
यामध्ये प्रचंड आक्रमण करून यांनी एकाधिकारशाही निर्माण केली आहे...
म्हणूनच आपला लढा फक्त आर्थिक नाही, तर सामाजिक आहे.. सांस्कृतिक आहे !

... आता बस्स ! सार्‍या जगाला आता कळलं आहे की ज्यू हा युरोपलाच नाही तर सार्‍या जगाला जडलेला गुप्तरोग आहे.
महा ज्यूंचा प्रश्न सोडवल्याशिवाय युरोपला शांतता लाभणार नाही !
माझ्या आयुष्याने मला अनेकदा भविष्यवेत्ता केलं ! आज मी पुन्हा एकदा भविष्यवेत्ता होऊन सांगतो...
 जागतिक व्यापारातल्या अमाप संपत्तीच्या जोरावर, ज्यूंनी युरोपला पुन्हा एकदा महायुद्धाच्या आगीत लोटलंच तर...
त्या महायुद्धाच्या झळा फक्त युरोपलाच बसणार नाहीत ! ज्यूंना ही भोगाव्या लागतील...
या युद्धाचे परिणाम बोल्शेविक क्रांतिमध्ये होणार नाहीत तर संपूर्ण युरोपमधून ज्यूंच्या नाहीसे होण्यामध्ये होतील...

[ प्रचंड टाळ्या. हिटलर आपला हात नेहमी प्रमाणे पुढे करतो. हेल हिटलर ! चे जयघोष दुमदुमतानाच अंधार.]

२३. गोष्टी सांगणारा माणूस...स्थलांतर


बालक ऋषिराज जन्मला तेव्हाच त्याला US ला सेटल करायचे ठरले.
नाव ऋषिराज अर्थात त्याच्या आजीने ठेवलेले. आजोबा दुर्वास किंवा जमदग्नी कॅटेगरीतले.
स्वदेशी चळवळीतून प्रेरणा घेऊन ते नित्यानेमे अंमळ देशी लावायचे म्हणून दुर्वास.
 ऋषिराजला संस्कृत आणि संस्कृति परायण करण्याच्या प्रयत्नात होते,
तेव्हा दुर्वासपुत्र उर्फ ऋषितात, ग्रीनकार्ड आणि इतर नियमांची छान -बिन करत होते.
दुर्वासपत्नीकडून बालक ऋषिराज जेव्हा गीतेतील अध्याय सुरात
आणि अर्थाची अजिबात चिंता न करता मुखोद्गत करत होते,
तेव्हा ममी नावाच्या घरात नव्याने घुसलेल्या असंस्कृत वस्तूने बालकास कुक्कुट गर्भ खावयास घालून हाहा:कार उडवून दिला.
बालक पंचम वयीन होताच त्यांस हिंदोस्तानी संगीताचे धडे सुरू करीत सेंट फ्रान्सिस नामे आंग्ल पाठशालेत प्रवेश मिळवून दिला.
असे प्रगति आणि संस्कृतीरक्षण एकसमयावच्छेदेकरून सुरू होते.

बालक ऋषिराज सर्व क्षेत्रांत प्रथम राहील हे पाहणे, ममी नावाच्या वस्तुचे प्रमुख कार्य होते.
या व्यतिरिक्त फावल्या वेळात करमणूक म्हणून तिने बँकेत वगैरे सेवा देण्यास दुर्वासांची काही हरकत नव्हती.
ते एकाचवेळी संस्कृतीरक्षक आणि प्रागतिक विचारांचे होते.
दुर्वास पत्नी दुपारी श्रांत महिला मंडळात रसाळ आणि सुश्राव्य अशी
हिन्दी चित्रपट गीतांच्या चालीवर बांधलेली भजने गात आपला संस्कृती रक्षणाचा कोटा पुरा करीत.
त्याचवेळी दुर्वास आपले स्वदेशी व्रत अंगिकारित असावेत, असा ऋषितातास संशय होता, पण पुरावा नसल्याने ते गप्प राहिले.
पुरावा अर्थात घरातील पाण्याच्या टाकीमागे दडवून दुर्वासांनी ती सुरू-बंद करणे आणि भरेपर्यंत शिडीवर उभे राहणे,
हे काम मोठ्या आवडीने स्वीकारले होते. प्रगतिशील कुटुंबात असेच सर्व घटकांचे कार्यरत असणे अभिप्रेत असते.
तरच संस्कृती टिकते आणि तिचे संवर्धन होते.

सेंट फ्रान्सिस नामक शाळेची प्रेयर जेव्हा बालक घरी ' ओ द अलमाइटी..' वगैरे स्वरांत मुखोद्गत करू लागले,
तेव्हा ईश्वर एक आहे, हे दुर्वासांनी ठणकावून सांगितले, त्यामुळे संस्कृती अबाधित राहिली.
शालेय शिक्षणाच्या प्रथम वर्षांत जेव्हा वर्गमित्राच्या बर्थ-डेला केक खाण्याची वेळ आली तेव्हा,
त्यांस परवानगी नाकारली गेली. त्याने घरी काय ते खावे, पण चारचौघांत संस्कृतीचे पालन करावे असे सर्वानुमते ठरले.
ऋषितात मात्र त्यावेळी वसईच्या मित्राकडे कुक्कुट सुपाचे आस्वाद घेऊ लागले होते.
बघता बघता ऋषिबाळ मोठे झाले आणि ९५ प्रतिशत गुण प्राप्त करीत
शालान्त आणि कनिष्ठ विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण झाले, कारण ते अपरिहार्य होते.
त्या नंतर लगेचच बालक ऋषिराज यांची रवानगी सरकारी कोशातील डॉलर्सचा विनियोग करीत,
स्थापत्यशास्त्राचे उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत करण्यात आली.
तेव्हा कोलंबसाने शोधलेला भारत, म्हणजेच अमेरिका, असा युक्तिवाद दुर्वास करू लागले.
तोवर ते त्यांच्या निवृत्तकर्मचारी हास्य मंडळात हास्याचा विषय झालेलेच असल्याने सभासदांस वेगळे हसण्याचे प्रयास होत नसत.
दुर्वास बोलले की मंडळात हास्याचे स्फोट सुरू होत. याने विभागातील शांतताभंग होत असल्याची तक्रार पोलिसांत आली होती,
पण तपासावर आलेले पोलिसही भरपेट हसू लागल्याने त्या विरूद्ध कोर्टात याचिका करावी असे तक्रारदारांस
म्हणजे दुर्वास यांचे खडूस शेजारी, आणि मंडुकशास्त्री असे टोपणनाव दिले गेलेले, बेडेकर (बेडूक!) यांस सुचवले गेले.
पण खर्च फार असल्याने त्यांनी तो बेत रहित केला.
त्या ऐवजी ऋषितातास, बाल्कनीत तुळशीच्या कुंड्या ठेवून सोसायटीचे नियम तोडल्याच्या पोलिस तक्रारीत गोवून,
ऋषीराजाचे अमेरिकेला जाणे अशक्य करावे, असा नवा उपाय त्यांना सुचला.
अशा खमक्या योजना त्यांस नित्यनेमाने सुचत, त्यामुळे आपले बेडेकर नाव मुंडकेश्वर असे बदलून घ्यावे, अशी इच्छा त्यांस होत होती.

सर्व अभद्रांवर मात करून आणि कुलस्वामिनीस चांदीचे मुकुट दान करून, ऋषिराजास अमेरिकेत धाडले गेले.
तिथे स्ंनातकोत्तर प्रशिक्षण घेऊन बालक तिथेच स्थिर झाले. अमेरिकेत दीड शतकांपूर्वी इटलीतून स्थलांतरित झालेल्या
कन्यकेशी त्याचा एका सुमुहुर्तावर विवाह संपन्न झाला.
त्यावेळी आर्य हे मूळ इटली आणि रोममधून भारतात स्थलांतरित झाले असा रोमांचक युक्तिवाद दुर्वासांनी केला
आणि त्यासाठी स्वरचित 'आर्यांचा इतिहास' या पुस्तकातील दाखले दिले.
या पुस्तकाचे नंतर जाहीर वाचन करायचे हास्यमंडळातर्फे ठरले.
पण विभागातील शांतताभंग होईल या डेसीबलिक कारणाने पोलिसांनी ते डीसेबल केले.
काही वर्षांनी ममी नावाची असंस्कृत वस्तू आणि ऋषितात कोलंबसी भारतात,
आद्य आर्यकुलीन स्नुषे सोबत स्थिरावण्यास निघून गेले.

तिथून ते सध्या भारतातील असांस्कृतिक राजकीय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असतात.

२२. गोष्टी सांगणारा माणूस... भागती अमावस्या


पूर्वेकडील पहाडी प्रदेशात एक प्रथा आहे... 

ज्याने कुणी अमावस्येच्या रात्री जंगलातील डाकिणीच्या झिंझ्यातला एक केस काढून आणेल,
त्याला कुबेराचा खजिना प्राप्त होतो.
त्यामुळे हा केस मिळवण्यासाठी पहाडी पोरां-सोरांपासून, म्हाताऱ्या-कोताऱ्यांपर्यंत सर्वांत एक चढाओढ असते.
हा केसही काढायचा तो, 'भागती' अमावस्येला.
भागती अमावस्या ही सर्व अमावस्येंतील खतरनाक मानली जाते.
म्हणून त्या अमावस्येला संध्याकाळी सातलाच जेवण-बिवण आटोपून ‘जोंगोल बोश्ती’ झोपी जाते.
साडेसातला जरी गेलात, तरी मिट्ट अंधार आणि सन्नाटा.
अशा गावात जायला, संध्याकाळी सातला ‘जोंगोल बोश्ती’ला पोहोचू या बेताने मी आणि केएम, दार्जिलिंगहून निघालो,
पण वाटेत फॅनबेल्ट लुज होऊन आम्ही पोहोचेस्तोवर आठ वाजून गेले. राह में सन्नाटा.
गाडीवाल्याने वाजवून दोनशे रुपये सवारी घेऊन आम्हाला रस्त्यावरूनच खाली जंगल बस्ती दाखवून सोडले.
आज भागती अमावस्या असल्याने मी आणि केएम, डाकिणीला पहायला तिथे आलो होतो.

 आता जंगलात उतरणारा मळका खडकाळ रस्ता उतरायचे.
केएम तिथला स्थानिक, त्यामुळे मला एरियाची खासियत, इथे-तिथे टॉर्च फेकत सांगत होता.
इथे ब्रिटिश काळात एक शांतो बॅनर्जी नावाचा रईस चहा मळेवला राहत होता.
त्याने बांधलेला वाडा आज ओसाड पडून आहे.
शांतोला एव्हढा पैसा असूनही कुबेराचा खजिना हवा झाला,
आणि तो भागती आवसेला डाकिणीच्या झिंझ्या उपटायला घोड्यावरून निघाला.
सकाळी फ़क्त घोडा परत आला.
शांतो नंतर कधीच कुणाला दिसला नाही. त्याचा वाडा पडून राहिला आणि कालांतराने दंतकथा झाला.

 आम्हाला वाटेत एक वळलेली पायवाट दिसली. केएम म्हणाला, ही काली मंदिरच्या खण्डहरकडे जाते.
तिथे हल्ली कोणीच जात नाही, डाकिणीच्या भीतीने. आपण जाऊ. निघालो.
सहा डिग्री थंडीने काकडत होतो, फुल बदन लपेटून फायदा होत नव्हता.
त्यात डाकिणीच्या एरियात मणक्यातून चिल शिरशिरी. रस्ता असा नव्हताच.
जाळी, पाने बाजूला करत आम्ही पडक्या मंदिरापर्यंत पोहोचलो.
ती नुसती वास्तू आमची तीन हात करत होती. आर या पार. 
डाकीण भेटलीच, तर केएम कुकरी आणि मी कडकडी घेऊन तयार होतो.
आम्ही मंदिर शक्य तितक्या बाजूने फिरून पाहिले. डाकिणीचा पत्ता नव्हता.
आम्ही परत जायला वळलो. रस्त्याला यायला फक्त केएमचा अंदाज होता.
मला वाटते आम्ही चुकलो. आणि भलतीकडे गेलो. तिथे एक उतार होता.
आम्ही खाली पाहिले, टॉर्च पोहोचत होता, तिथवर अंधार होता. काही कळत नव्हते.
उलटे वळणार तोच, अंधाराच्या भुयारातून टापांचा आवाज ऐकू आला. काहीतरी येत होते.
केएम ने टॉर्च बंद केला. अंधारात डोळे फाडून आम्ही पाहत होतो.
काहीतरी सफेद, घोड्यासारखे दिसले. त्यावर काहीतरी बसलेले.
ते वाढत होते! पाच फूट-दहा फूट- वीस – च्यायला !! केएम बोलला, "भाग साले!!"

आणि आम्ही उलटे पळत सुटलो. केएम क्षणभर टॉर्च फेकायचा, बंद करायचा.
आम्ही अंदाजे पळत होतो. झाडे, फांद्या, काटक्या आणि पायाला दगड- बोचून काढत होते.
आम्हाला रस्ता दिसला. तो समोर गावात जात होता.
भागती अमावस्येच्या किर्र रात्री आम्ही
संध्याकाळी सातलाच गपगार झालेल्या ‘जोंगोल बोश्ती’कडे धावत होतो.

२१. गोष्टी सांगणारा माणूस... बत्तेचाळीस


बत्तेचाळीस हे असे वय आहे, ज्यात तुम्ही तरुण,प्रौढ, वयस्क, कशात येत नाही.
माणसाने कायम बत्तेचाळीसमध्ये रहावे.
जे बत्तेचाळीसांत बसत नाहीत, त्यांनी जन्मतारीख, कुंडली एडजेस्ट करून बत्तेचाळीसांत बसावे.
फिट बसावे, हिट दिसावे.
टमरु बत्तेचाळीस झाला त्याला आता दहा-वीस वर्षे होऊन गेली असतील. तो अजून बत्तेचाळीसच आहे.
बत्तेचाळीसमध्ये माणसाची बौद्धिक वाढ खुंटते- फ्रीज़ होते. तो युगानुयुगे बत्तेचाळीसमध्ये राहतो.
मी माझ्या आजुबाजूला अनेक बत्तेचाळीस पाहिले.... त्यात पुरुष होते- स्त्रियाही होत्या.
तेव्हा पुढे कधीतरी आपण बत्तेचाळीस होऊ असे माझ्या ध्यानातही आले नव्हते.

बत्तेचाळीसचा मानव सत्य हाती गवासल्यासारखा ठाम होतो.
माणूस निवृत्त झाल्यावर त्याची इनकम बंद होते, तशी त्याची बौद्धिक इनपुट बंद होते.
एकप्रकारे बत्तेचाळीस म्हणजे बैद्धिक निवृत्ति घेतलेला माणूस.
मजेदार बाब म्हणजे या वयात त्याचे वाचन-चिंतन वगैरे सुरूच असते.
मात्र त्याची मते मागेच् कधीतरी सत्य ठरल्याने या वाचनातून-चिंतनातून नवे काहीच गवसत नाही.
असे अनेक बत्तेचाळीस देशात मिनिटागणिक पैदा होत आहेत.
लोकसंख्यावाढीचा प्रश्न यापुढे काहीच नाही.
बत्तेचाळीस हा राष्ट्रापुढला मोठा धोका आहे. कॉंग्रेसी किंवा भाजपा वगैरे नाही.
जर राष्ट्राचे संपूर्ण बत्तेचाळीसीकरण झाले, तर आपल्याला स्वातंत्र्य, बत्तेचाळीसला मिळाले, असे मानावे लागेल.
आपण आपल्या आजुबाजूस बत्तेचाळीस किती आहेत याची जाणीव ठेवायला हवी.
त्याची शक्य झाले तर सरकार-दरबारी नोंद ठेवायला हवी.
हे करताना आपण बत्तेचाळीस झलेलो नाही, याची आवर्जून तपासणी करायला हवी.
 बत्तेचाळीस हा एकप्रकारे बौद्धिक देवानंद आहे.
त्यामुळे तो 'चालताना' लटपटत असतो, मात्र याला तो बैठक असे स्टायलिश नाव देतो.
 या बत्तेचाळीसांमुळेच राष्ट्रात सांप्रति फेसबुक प्रदेशी वा इतरत्र अनेक वाद चिघळताना दिसतात.

पुर्वी माणूस शारीरिक वय बत्तेचाळीस पार पडले की, बत्तेचाळीस होत असे.
आज 'सोमी' मुळे माणूस विशीतच बत्तेचाळीस होऊ लागलाय,
हा राष्ट्रापुढील गहन चिंतनाचा विषय आहे.
मात्र हे गहन चिंतन करण्यासाठी बत्तेचाळीस पदास न पोहोचलेले विचारवंत कुठून आणायचे?
त्यासाठी निविदा मागवाव्या लागतील.
पण समजा निविदाही बत्तेचाळिस आल्या तर?

२०. गोष्टी सांगणारा माणूस... धंदा समाजवादाचा- २


वर्षे गेली आणि धन्नोच्या समाजवादी बापाला झटका आला.
त्याने धन्नोला अल्टीमेटम दिला.
अठ्ठेचाळीस तासांत पोटापाण्याचं काय करणार ते ठरव. समाजवादाचं काही खरं दिसत नाही.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचे डिपॉझिट काठावर वाचले होते.
ऑपोजिशनने मिरवणुकीत गाणी पण म्हटली होती.

 "गजा रे गजा काय तुझी मजा,
समाजवादाचा वाजवतो बाजा,...
डिपॉझिट वाचलंय थोडक्यावरी
न गजा बसलाय घोडीवरी."


समाजवादी राजकारणावर पोराला पोसता येणार नाही,
हे लक्षात आल्यावर बापाने धन्नोला 48 तासांचा अल्टीमेटम दिला.
धन्नो टेन्स होऊन मॅकला घेऊन माझ्याकडे आला.
"अड़तालीस घंटे में सोचो, बिझनेस क्या करनेका? सोचने का रिवॉर्ड मिलेगा!"
या देशात विचार करायचे पैसे मिळतात, हे आम्हाला पहिल्यांदा कळलं.

पुढचे अठ्ठेचाळीस तास, धन्नो बियरवर होता, सोबत आम्ही होतो.
फ़क्त लंडन पिल्सनर आणि विचार! धन्नोला कोणता क़ारोबार सूट होईल?
मॅकने स्टेशनवर तीन पत्ते फिरवण्यापासून, लकी सोडत स्किमपर्यंत अशा आयडिया दिल्या की,
मॅक देशाचा अर्थमंत्री झाला, तर देश कुठच्याकुठे जाईल, यावर आमचे एकमत झाले.
मात्र त्याच्या स्किमवर अंमल केला तर धन्नो कुठल्याकुठे न जाता बाराच्या भावात जाईल,
याचा आम्हाला अंदाज आला.
त्यातल्यात्यात मॅकने दिलेला बरासा धंदा होता, मंदिर टाकणे!
फूल टू कमाई आणि नो टॅक्स.
पण धन्नोचा बाप समाजवादी असल्याने मंदिराचा बेत मागे पडला.
धन्नोला समाजवादी टच असलेला कोणता धंदा द्यावा? समजेना.
यात भांडवलदार LP कंपनी मात्र रईस होत होती.
अठ्ठेचाळीस तासांनी निर्णय झाला. काहीच करायचे नाही. एकदम समाजवादी धंदा!
पैसेवाल्याकडून उधार घ्यायचे, गरीबाला मदत म्हणून.
सहसा तो परत मागत नाही. मागितले, तर दुसरा रईस पकडायचा.
त्याचा माल पहिल्याला द्यायचा. 52 दिवसांचे क्रेडिट रोलिंग!
दुसऱ्याने मागितले की तिसऱ्याकडून घ्यायचे! दुसऱ्याला द्यायचे!
सगळ्यांना सामान वाटणी की आला समाजवाद!

मॅक देशात समानता आणू शकेल असा एकमेव अवलिया आहे.
"अरे, पण बापाने विचारले, कसला धंदा करतोस? तर...?
"त्यात काय आहे? सांग रोलिंगचा धंदा!"
जगातील पहिल्या समाजवादी बिझनेसच्या शोधाचे श्रेय, मॅककड़े जाते !

१९. गोष्टी सांगणारा माणूस... धंदा समाजवादाचा- १


धन्नोचा बाप समाजवादी नेता होता.
म्हणजे जेव्हा समाजवादी फॉर्मात होते, तेव्हाची गोष्ट.
समाजवादी फॉर्मात कधी होते? तर होते एकदा.
खूप-खूप वर्षांपूर्वी समाजवादाला बरें दिवस होते,
तेव्हा चड्डीला कंटाळून काही लोक समाजवादी झाले, त्यात धन्नोचा बाप होता.
पण तो ज़माना जाऊं दे, मी धन्नोची इस्टोरी सांगतोय.
तर समाजवादी बापाचा लेक काहीच करे ना!
समाजवादात सर्वांनी कष्ट करायची गरज नसते, असे त्याने कुठेतरी वाचले.
राबवले.
बापाशी वाद झाला तेव्हा त्याला पटवून दिले!
लायसन्स टू चिल!
धन्नो सकाळी स्टेशनरोडला पुलावर हमाल- कड़ियांत असायचा,
रात्री भाजीमार्केटचे भैये भिशीवर राहयाचे, त्यांत असायचा.
सकाळी सातारी आणि रात्री लंगरवर.
बाप खुश... पोरगा नाव काढणार...
गरीब, पददलित आणि उपेक्षित, म्हणजे समाजवादाचे फ्यूअल. 
सगळा  करोबार, या फ्यूअलवर बेतलेला. 

आपल्या बापाची लाइन, धन्नोने  पाळण्यातच  ताडली असणार. कारण पाळण्यात असल्यापासूनच तो काही करत नाही. त्याची ही लाइन बघूनच त्याच्या आत्याने त्याच्या कानात, धन्नो sss अशी फुंकर घातली असणार. असा समाजवाद्याच्या  घरात धन्नो पैदा झाला. शाळेत घातल्यापासून  धन्नोने शेवटच्या बाकावर बसण्याखेरीज काहीच केले नाही. शाळेच्या प्रोटोकॉल प्रमाणे वरचे वर्गात गेला / घातला/ ढकलला शेऱ्यांनी  त्याचे प्रगतीपुस्तक लालमलाल दिसत असे. थोडक्यात, शाळेत अभ्यासातला अ सुद्धा न काढता धन्नो मॅट्रिक झाला. संपूर्ण पस्तीस टक्के! हा सृष्टीतला एक चमत्कार होता. धन्नोलासुद्धा अजून तो समजलेला नाही. मात्र त्या वर्षी, धन्नोच्या पाठी बसणारा मुलगा सर्व विषयांत फेल् झाला म्हणतात. होणारच! त्याने धन्नोची कॉपी केली असणार! 

मॅट्रिक झाला आणि प्रथे-परंपरेने  तो कॉमर -आठ- नायतर  सायनला गेला. वर्ग कोणताही असो, धन्नोला त्याच्याशी काही देणे-घेणे नव्हते. हा, इथे त्याची प्रगती होऊन तो मळणी करू लागला. बोलताना तोंडात गोटी ठेवून बोलायचं- त्याची लाळ  गळायची, असा भलताच आजार त्याला झाला. मात्र गाडी बारावीला अटकल्याने कॉलेज सुटले- तमाखू नाही. आता धन्नो बारा महिने, तेरा काळ कॉलनीत नाका, कट्टा, मंदिर, चौरसियाचा ठेला- इथे पडून असायचा. कुणाशी काही बोलायचाच नाही, काही विचारलं तर खुणा करत उत्तरे द्यायचा. 

धन्नोच्या बापाला आता टेंशन आले. समाजवाद असला म्हणून काय झाले? त्यात एकाने काहीच काम करायचे नाही, असे कुणी लिहून ठेवलेले नव्हते. धन्नोने काही उद्योग धंद्याचे करावे म्हणून त्याने नाना प्रयास केले. एकदा तो जोशी काकांच्या वाणसामान दुकानात पुड्या पण बांधायचा. मग एक दिवस त्याने जोशी काकांचीच पुडी बांधली, आणि ते सुटले! मग मंडप- डेकोरेटर्सचे काम करणाऱ्यांवर देखरेख करायला याला ठेवला, पण याच्यावर देखरेख करणार कोण? म्हणून ते ही सुटले.धन्नोच्या आयुष्यात उद्योग-धंदा असा सणासुदीला येऊन जायचा. बाकी बारा महिने बेकार.आपल्या या स्वयंभू पोराचे  करायचे काय? हे समाजवादी बापाला कळेना.. 

१६. गोष्टी सांगणारा माणूस...

 
यह बाप हराम की कमाई नही लेता

एक मनसुखरायजी ने बडी मेहनत से अपना छोटासा कारोबार बनाया। खुद पढ़ सका इसलिये अपने बच्चे को, धनदीप को पढ़ा लिखाना उपना फर्ज समझा जब विदेश जाकर पढनेका वक़्त आया तब उन्होने अपना कारोबार बेचकर उसकी पढाई का खर्चा उठाया बच्चेको समाज में प्रतिष्ठा मिले यह देखना चाहते थे। आज धनदीप पढ़-लिख कर एक बड़ी कार्गो कंपनी का मालिक बन गया हैमगर यह कंपनी विदेश से एक्साइज, कस्टम ड्युटी चुकानी पड़े इसलिये नकली कचरा , स्क्रैप के रूप में  विदेश से माल ला रहा है। एक तरह की स्मगलिंग ही है यह। मगर धनदीप मानने को तैयार नही। उसका कहना है, आजकल सभी कारोबार ऐसे ही चलते है। पैसा आनेपर धनदीप प्रतिष्ठीत भी बन चुका है। उसे अपनी करतुत पर गर्व है। मनसुख भाई को जब अपने बच्चे की करतुत का पता चला है, उन्होने उसके पैसेसे मिले सुख, समाधान को स्वीकारने से मना किया है। वह एक विरक्त साधू की तरह ही उस घर में सिर्फ दो वक़्त आते है, सोने और खाने। अपना सारा समय उन्होने गरीबों की सेवा करनेवाले एक आश्रम के लिये दिया है। धनदीप और उनमें जराभी नही बनती। आज उअनके सामने एक बड़ा प्रश्न है, उनकी हार्ट का बायपास करना है जिस्के लिये तीन लाख रूपये चाहीए। मगर धनदीप की कमाई हराम की कमाई है। वह लेना नही चाहते।  आज डाक्टर की रीपोर्ट आनेपर धनदीप उन्हे अस्पताल में भर्ती होने की जिद कर र्हा है, मगर वह इस्के लिये तैयार नही है। उनका कहना है, की इस देश में लाखो लोग पैसे होने के कारण बगैर इलाज के ही मर जाते है, इसमें एक मैं बन जाऊँ तो भी क्या? दोनो का झगडा, धनदीप कहता है, गर मेरे पैसे से इअलाझ नही करवाना है, तो यह घर छोड दो! वर्ना लोग मुझपर थूकेंगे, बाप का इलाज करनेवाला जाहिल कहेंगे। झगडे में मनसुखभाई के सीने में दर्द शुरू होता है। मगर वह दीखाते नही। अपने आप को सम्हालते है, एक झोली उठाकर हमेशा के लिये आश्रम जाने के लिये निकलते है। जाते जाते वह धनदीप को जो सुनाते है वह अपने आप में एक मिसाल है।